श्री दत्तात्रेयांचे अवतार
एकूण सोळा अवतार दत्तात्रेयांनी घेतले असे भाविक मानतात. दत्तसांप्रदायिक श्रीपादवल्लभांना व नृसिंह सरस्वतींना इतिहासकाळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मानतात. दासोपंतांच्या परंपरेत दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते. इतकेच नव्हे, तर अक्कलकोटच्या स्वामीमहाराजांची आणि माणिकप्रभूंचीही दत्तावतारातच गणना होते. श्री गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार खालीलप्रमाणे;
योगिराज
१) योगिराज
प्रकट:- कार्तिक शुध्द १५
ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.
श्री ब्रम्हदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली खरी पण या विश्वाच्या निर्मितीनंतर सर्व जिवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मांप्रमाणे जे दुःख सहन करावे लागले ते पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले आणि म्हणून ते विश्वाच्या प्रभूला श्रीविष्णु यांना शरण आले. *"दत्तोsहम् दत्तोsहम्"*
(मी स्वत: देतो- समर्पित करतो - शरण आलो आहे) अशी प्रार्थना केली. सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ब्रम्हदेवांना योग आणि अात्मतत्त्वाचे ज्ञान करून त्यांना चिंतामुक्त केले आणि मनःशांती देऊन त्याचा प्रचार करण्यास उद्युक्त केले.
"दत्तोsहम् दत्तोsहम्" चा जप करणार्यांनाही समान फळ मिळेल असा आशिर्वादही दिला. हा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला, कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी, पहिल्या प्रहरी, सूर्योदयाच्या वेळी झाला.
(मी स्वत: देतो- समर्पित करतो - शरण आलो आहे) अशी प्रार्थना केली. सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ब्रम्हदेवांना योग आणि अात्मतत्त्वाचे ज्ञान करून त्यांना चिंतामुक्त केले आणि मनःशांती देऊन त्याचा प्रचार करण्यास उद्युक्त केले.
"दत्तोsहम् दत्तोsहम्" चा जप करणार्यांनाही समान फळ मिळेल असा आशिर्वादही दिला. हा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला, कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी, पहिल्या प्रहरी, सूर्योदयाच्या वेळी झाला.
या अवताराने योगाचा (योग म्हणजे संपूर्ण अष्टांग योग / युज् म्हणजे जोडणे - स्वतःला परमेश्वराशी) प्रचार केला, म्हणून त्याला 'योगेश्वर' किंवा 'योगीराज' म्हणून ओळखले जाते. ह्या अवतारात श्रींचे स्वरूप सर्वात आकर्षक, नाजूक आणि बर्फासारखे शुभ्र होते. श्रीकृष्णाप्रमाणे, त्याला एकमुखी आणि चतुर्भूज होते.
'दत्तोsहम्' प्रबोधकाय
श्रीकृष्णा जगदीश्वरा
योगेश्वरावताराय
दत्तात्रेयाय नमो नम: |
"दत्तोsहम्" या मंत्राचा उपदेश करणाऱ्या (मी स्वतःला देतो म्हणजे माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो - ही समर्पणाची भावनाच भक्तिमध्ये सर्वात महत्वाची आहे. तरच भक्त सद्गुरूकृपेस प्राप्त होतो.) श्रीकृष्णस्वरूप संपूर्ण जगाचे ईश्वर असणाऱ्या, योगीराज अवतार धारण करणाऱ्या, श्रीदत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
२) अत्रिवरद
जन्म:- कार्तिक कृष्ण प्रतिपदा
अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,"तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.' या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते.
अत्री ऋषी असले तरी गृहस्थाश्रमीही होते. त्यामुळे आपल्या वंशामुळे लोककल्याणाचेही काम व्हावे अशी त्यांची मनिषा होती. ते विद्वान होते; त्यामुळे आपल्या पोटी असा पुत्र यावा जो सर्व तीन लोकामध्ये प्रसिद्ध होईल आणि लोकांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल या हेतूने त्यांनी ऋष्य पर्वतावर तीव्र तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचे तेज एवढे प्रखर होते की त्याची झळ तीनही लोकांना पोहोचू लागली आणि सर्व जीवसृष्टी अस्वस्थ झाली. तेव्हा सर्व देव आणि ऋषी-मुनींनी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना विनवणी केली.
मग ब्रह्मदेव , हंसवर, गरुडावर श्री विष्णु आणि नंदीवर भगवान जाश्र्वनीळ आरूढ झाले आणि ऋषी अत्रीसमोर हजर झाले व त्यांनी अत्रीऋषींना तपातून जागे केले. अत्रींऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, "मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल." तेव्हा त्रिदेव म्हणाले,
"आपण ज्याचे लक्ष्य केले आहे त्या प्रमाणेच आम्ही आहोत. आम्ही तीन रूपांत दिसतो; पण आम्ही एक आहोत. माया (भ्रम) त्रिगुणात्मक आहे - सत्व, रज आणि तम. रज तत्वाने उत्पत्ती होते, सत्वगुणामुळे पालनपोषण व संरक्षण होते आणि तमोगुण संहारास कारणीभूत होतो. या तीन शक्ती प्रमुख आहेत. परमात्म्यामध्ये या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच तीन स्वरूपे आम्ही आहोत परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत." असे म्हणून तिघेही एकरूप झाले. आता अत्री ऋषींच्या समोर परमेश्वराचे सोन्यासारखे तेजःपूंज रूप दिसत होते. त्यांना तीन मुखे होती, सहा हात होते. सहा हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. ह्या सुंदर अवतारातील तिनही श्रीमुखांवर मंद हास्य होते. देवाने या रूपात अत्रिऋषिंना "तुझि ईच्छा पूर्ण होईल" असे वरदान दिले म्हणूनच या अवतारला 'अत्रिवरद' म्हणून ओळखले जाते. हा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदा, रोहिणी नक्षत्रावर, गुरुवारी, पहिल्या प्रहरी आणि पहिला मुहूर्तावर झाला.
मग ब्रह्मदेव , हंसवर, गरुडावर श्री विष्णु आणि नंदीवर भगवान जाश्र्वनीळ आरूढ झाले आणि ऋषी अत्रीसमोर हजर झाले व त्यांनी अत्रीऋषींना तपातून जागे केले. अत्रींऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, "मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल." तेव्हा त्रिदेव म्हणाले,
"आपण ज्याचे लक्ष्य केले आहे त्या प्रमाणेच आम्ही आहोत. आम्ही तीन रूपांत दिसतो; पण आम्ही एक आहोत. माया (भ्रम) त्रिगुणात्मक आहे - सत्व, रज आणि तम. रज तत्वाने उत्पत्ती होते, सत्वगुणामुळे पालनपोषण व संरक्षण होते आणि तमोगुण संहारास कारणीभूत होतो. या तीन शक्ती प्रमुख आहेत. परमात्म्यामध्ये या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच तीन स्वरूपे आम्ही आहोत परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत." असे म्हणून तिघेही एकरूप झाले. आता अत्री ऋषींच्या समोर परमेश्वराचे सोन्यासारखे तेजःपूंज रूप दिसत होते. त्यांना तीन मुखे होती, सहा हात होते. सहा हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. ह्या सुंदर अवतारातील तिनही श्रीमुखांवर मंद हास्य होते. देवाने या रूपात अत्रिऋषिंना "तुझि ईच्छा पूर्ण होईल" असे वरदान दिले म्हणूनच या अवतारला 'अत्रिवरद' म्हणून ओळखले जाते. हा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदा, रोहिणी नक्षत्रावर, गुरुवारी, पहिल्या प्रहरी आणि पहिला मुहूर्तावर झाला.
रज-सत्व-तमात्मका
त्रैमूर्ती परमेश्वरा
अत्रिवरदावताराय
दत्तात्रेयाय नमो नम: |
रज, सत्व आणि तम हे मायेचे तीन गुण असले तरीही त्यांचे आत्मक म्हणजे मूळस्वरूप एक असलेल्या, त्रैमूर्तीरूप परमेश्वराला, अत्रिवरद हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो .
३) दत्तात्रेय
जन्म:- कार्तिक कृष्ण २
भगवती श्री हरी कार्तिक वद्य द्वितीयेच्या दिवशी, मृग नक्षत्रावर, शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी प्रथम मुहूर्तावर लहान मुलाच्या रूपात अत्रीऋषींसमोर प्रकट झाले. त्यांची प्रभा रंगीत इंद्रनील मण्यासारखी होती. ते नीलवर्ण असून त्यांचा चेहरा चंद्रासारखा आनंददायी होता. ते चतुर्भूज असून त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. विभूती त्यांच्या शरीरावर विलेपित होती आणि त्यांच्या कपाळावर केसांचा बटा होत्या. अशा स्वरूपात ते अत्रीऋषींसमोर आले आणि म्हणाले, "दत्तोsहम्" (ज्या परमात्म तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून ईच्छा केलीत तो मी तुमच्यासमोर पुत्र म्हणून उभा आहे.) यावर ऋषीदांपत्य अत्री व अनसूया म्हणाले,
"जगदीश्वरा जोपर्यंत तू आमच्यापोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही." त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन, श्री हरींनी ज्योतीरूपाने अत्रीऋषींच्या हृदयांत प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि-अनसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.
"जगदीश्वरा जोपर्यंत तू आमच्यापोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही." त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन, श्री हरींनी ज्योतीरूपाने अत्रीऋषींच्या हृदयांत प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि-अनसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.
इंद्रनीलसमाभासा | भस्माोद्धूलितविग्रहा ||
दत्तात्रेयावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
इंद्रनील मण्यासारखी आभा असलेल्या, भस्मविलेपित विग्रह (म्हणजे रूप) असलेल्या, दत्तात्रेय अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार.
श्री दत्तात्रयांचा हा अवतार याच नावाने ओळखला जातो. अत्रिवरद अवतारात श्री दत्तात्रेयप्रभू ने अत्रिऋषींना, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेवून तुमच्या येथे पुत्ररुपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले. अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रिमुनींना त्रिमूर्तीच्या रुपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला. पुत्ररुपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भूषविन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले. त्यानंतर अत्रिमुनि व सती श्री अनसूया यांनी त्रिमूर्ती या रुपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले. काही काळाने परमेश्वराने अत्रिऋषींना व अनसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले. “मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हांला इष्ट वर दिलेला आहे. त्याप्रमाणे आज मी तुमच्यापुढे स्वत:ला अर्पण करुन दत्तारुपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे”. तोच हा अवतार संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेय नावाने प्रसिध्दीस आला. दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक वद्य व्दितीयेच्या दिवशी झाला. त्या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते.
४) कालाग्निशमन
यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन' हे नाव पडले.
जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध १५
श्री दत्तात्रेय यांनी अत्रिमहर्षि व सती अनसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरसरुपाने जो चौथा अवतार घेतला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो. दत्तात्रेयांच्या सोळा अवतारातील श्री कालाग्निशमन भगवान दत्तात्रेयांचा हा प्रमुख अवतार मानला जातो. अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येचे हे मूर्तिमंत फल असल्यामूळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे.
ऋक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्रिऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले. त्या तेजाने अत्रिमुनींच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला. सर्वज्ञ भगवान श्रीहरि यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रिमुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरिता श्रीहरिने अत्रिमुनींच्या अंतरंगात प्रवेश केला. या वेळी परमेश्वराचे तेज कोटिचंद्राप्रमाणे अत्यंत शीतल व आल्हादायक होते.अत्रिमुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करुन अत्रिमुनींच्या देहाला नखशिखान्त शांत व शीतल केले. अत्रिमुनींचा ताप निवाला. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामूळे अत्रिमुनींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्नीशमन असे नाव देण्यात आले.
दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्नीशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मास मानला जातो. कारण तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे. तो परमात्मस्वरुपच आहे. शिवाय हा महिना अन्नधान्याने समृद्ध असतो. दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पोर्णिमा होती, शुक्ल पक्ष होता, बुधवार होता. मृग नक्षत्र होते.
कालाग्निशमन हा श्री दत्त महाराजांच्या सोळा अवतारांपैकी हा चौथा अवतार सर्वात प्रमुख म्हणून ओळखला जातो. अत्री ऋषींची साधना चालूच होती.
(ऋष्यकूल पर्वतावर केलेल्या अतिशय कठोर तपस्येमुळे अत्री ऋषी अतिशय तेजस्वी दिसू लागले आणि त्यांचे शरीर खूप गरम झाले. तेव्हा भगवान श्री हरि अत्री ऋषींचा दाह कमी करण्यासाठी आले हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवतारात पाहिले. यामुळे अवतारला 'कलाग्निशमन' असे म्हटले जाते. कारण कलियुगाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराने केलेली ही योजना होती.) जेव्हा अत्री ऋषींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्यासमोर प्रेममूर्ती अनसूया माता उभ्या होत्या. जे तेज अत्री ऋषींच्या हृदयात प्रविष्ट झाले होते ते आता त्यांच्या नेत्रांद्वारे अनसूया देवींच्या शरीरात प्रवेशले. हे सर्व मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झाले. हीच तेज रूप गर्भधारणा होती. भगवंताची लीला एवढी अगाध आहे की पुढे नऊ महिन्याचा कालावधी नऊ दिवसांत पूर्ण झाला आणि दैवी स्वरुपात मार्गशीर्ष पौर्णिमेला परब्रह्म अनसूया मातेसमोर प्रकट झाले. पण मातेची वात्सल्याची हौस फिटली नव्हती.
त्यांनी देवाला विनम्रतेने विनवणी केली की,"जोपर्यंत माझ्या गर्भापासून मनुष्य म्हणून आपण जन्म घेत नाही येऊ तोपर्यंत माझे समाधान होणार नाही. तेव्हा कृपा करून आपल्या बाललीलांनी आम्हा उभयतांना मात्यापित्याचे सुख देऊन संतुष्ट करावे." त्याविनंतीवरून श्री हरींनी नवजात बालकाचे रूप घेतले आणि अनसूया मातेच्या मांडीवर खेळत राहिले. यावेळी मृग नक्षत्र होते. परमेश्वरी अवतार हे तेज रूप असतात. मनुष्य जगताचे प्रत्येक नियम त्यांना लागू होतातच असे नाही आणि झाले तरी त्यात योग्य ते बदल ईश्वरी योजनेनुसार होतात.
(ऋष्यकूल पर्वतावर केलेल्या अतिशय कठोर तपस्येमुळे अत्री ऋषी अतिशय तेजस्वी दिसू लागले आणि त्यांचे शरीर खूप गरम झाले. तेव्हा भगवान श्री हरि अत्री ऋषींचा दाह कमी करण्यासाठी आले हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवतारात पाहिले. यामुळे अवतारला 'कलाग्निशमन' असे म्हटले जाते. कारण कलियुगाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराने केलेली ही योजना होती.) जेव्हा अत्री ऋषींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्यासमोर प्रेममूर्ती अनसूया माता उभ्या होत्या. जे तेज अत्री ऋषींच्या हृदयात प्रविष्ट झाले होते ते आता त्यांच्या नेत्रांद्वारे अनसूया देवींच्या शरीरात प्रवेशले. हे सर्व मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झाले. हीच तेज रूप गर्भधारणा होती. भगवंताची लीला एवढी अगाध आहे की पुढे नऊ महिन्याचा कालावधी नऊ दिवसांत पूर्ण झाला आणि दैवी स्वरुपात मार्गशीर्ष पौर्णिमेला परब्रह्म अनसूया मातेसमोर प्रकट झाले. पण मातेची वात्सल्याची हौस फिटली नव्हती.
त्यांनी देवाला विनम्रतेने विनवणी केली की,"जोपर्यंत माझ्या गर्भापासून मनुष्य म्हणून आपण जन्म घेत नाही येऊ तोपर्यंत माझे समाधान होणार नाही. तेव्हा कृपा करून आपल्या बाललीलांनी आम्हा उभयतांना मात्यापित्याचे सुख देऊन संतुष्ट करावे." त्याविनंतीवरून श्री हरींनी नवजात बालकाचे रूप घेतले आणि अनसूया मातेच्या मांडीवर खेळत राहिले. यावेळी मृग नक्षत्र होते. परमेश्वरी अवतार हे तेज रूप असतात. मनुष्य जगताचे प्रत्येक नियम त्यांना लागू होतातच असे नाही आणि झाले तरी त्यात योग्य ते बदल ईश्वरी योजनेनुसार होतात.
अत्रिअनसूयामोदकाय | शशीवर्णा श्रीहरी ||
कालाग्निशमनावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
ऋषी अत्री आणि माता अनसूया यांना मोद म्हणजे आनंद देणाऱ्या, शशी म्हणजे चंद्रासारखे शीतल पण तेज युक्त वर्ण असणाऱ्या (यामुळेच अत्री ऋषींचा दाह शांत झाला), कालाग्निशमन हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
५) योगीजनवल्लभ
या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे.
जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध१५
अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी इंद्रादी देव, ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले. त्या सर्वांची ती उत्सुकता पाहता, श्री दत्तात्रेय एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले.
"मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही. मी जन्म आणि मृत्यू रहित आहे.
(मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरी ही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही." हे अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवतारला 'योगिजन वल्लभ' म्हणून ओळखले जाते. (योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत.)
"मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही. मी जन्म आणि मृत्यू रहित आहे.
(मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरी ही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही." हे अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवतारला 'योगिजन वल्लभ' म्हणून ओळखले जाते. (योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत.)
हीच दत्तजयंती म्हणून आपण साजरी करतो.
सुरगणादिवंदिताय | बालरूपा निरंजना ||
योगिजन-वल्लभावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
सुरगण म्हणजे देव - ऋषिंद्वारे वंदिल्या गेलेल्या, बालरूप आणि निरंजन म्हणजे ज्यात कुठलेही अंजन किंवा अशुद्धी नाही (जे निर्मळ, शुद्ध, परम पवित्र आहे). अशा योगिजन-वल्लभ अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
६) लिलाविश्वंभर
दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला.
जन्म:- पौष शुद्ध १५
या अवतारात श्रीदत्तात्रेयांचे मुलांसाठीचे प्रेम आणि प्रखर दयाळूपणा पाहण्यासारखा आहे. त्या काळात देशात एक भयंकर दुष्काळ पडला होता. प्राणी अन्न आणि पाण्याविना पार सुकून गेले होते. चोर आणि दरोडेखोर यांनी लोकांना अन्नपाण्यासाठी लुटणे चालू केले होते.
ऋषीमुनी त्यांची उपासना करू शकत नव्हते आणि यज्ञव्यवस्था जवळपास मोडकळीस आली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी ब्राह्मण इत्यादींनी श्री दत्तप्रभूंना शरण गेले. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेतलेले श्रीगुरू जेमतेम एक महिन्याचे होते आणि माता अनसूया यांच्या मांडीवर स्तनपान करीत होते.
ऋषीमुनी त्यांची उपासना करू शकत नव्हते आणि यज्ञव्यवस्था जवळपास मोडकळीस आली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी ब्राह्मण इत्यादींनी श्री दत्तप्रभूंना शरण गेले. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेतलेले श्रीगुरू जेमतेम एक महिन्याचे होते आणि माता अनसूया यांच्या मांडीवर स्तनपान करीत होते.
भक्तांची प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभू त्यांच्यासमोर "लीला विश्वंभर" म्हणून प्रकट झाले आणि सर्वांना अन्न, वस्त्रे आणि धनधान्ये दिली आणि त्या सर्वांना संतुष्ट केले. हे सर्व त्यांनी लीलया केले आणि म्हणून या अवताराला 'लीला विश्वंभर' म्हणून ओळखले जाते. श्री दत्तात्रेयांनी भक्तांना नंतर संबोधित केले की, "हे जीवन एका घनदाट जंगलासारखे आहे. ज्यात अहंकार हा एक मोठे वृक्ष, वेली व वनस्पती यांनी सभोवती वेढलेला एक मोठा पर्वत आहे. काम म्हणजे भयानक सिंह, क्रोध म्हणजे (क्रोधाचा) एक संतापलेला साप आहे, वासना (इच्छा) एक गहिरा तलावाच आहे. जे लोक हे पार करू शकत नाहीत, ते खोल गर्तेत बुडतात."श्री दत्तात्रेयांनी नंतर हे दृश्य बोलता बोलता अचानक अदृश्य केले. मग, भक्तांनी विचारले,"स्वामी, हे भयंकर जंगल कुठे गेले?" स्मितहास्य करीत श्रीगुरू म्हणाले,"ज्यातून निर्माण झाले आहे, त्यातच विसर्जनही झाले आहे. अज्ञानामुळे हे अस्तित्वात येते आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा ते नष्टही होते. म्हणूनच जे माझे स्मरण करतील ते संसार कर्दमातून मुक्त होतील. हे संपूर्ण जग असेच नश्वर आहे आणि केवळ मूळ आत्मतत्त्वच अविनाशी आहे, जे मुळ आहे, तेच फक्त टिकणारे आहे." यावर भक्तांनी विचारले, "स्वामी, हे आत्मतत्त्व कसे आहे?" श्री दत्तात्रेय म्हणाले, "मीच ते आत्मतत्त्व आहे.
चांगले कर्म आणि शुद्ध भक्तीच्या द्वारे मला जाणता येते"
सर्वसंकटविमुक्ताय | कामक्रोधादिवर्जितः ||
लीला विश्वंभराय स्वामी | दत्तात्रेयाय नमो नम: ||
सर्व संकटांपासून विमुक्त करणाऱ्या, काम क्रोधादी षड्रिपूंच्या पलिकडे असणाऱ्या, लीला विश्वंभररूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
७) सिद्धराज
भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिध्दराज' नावाचा सातवा अवतार.
जन्म:- माघ शुद्ध १५
सद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय यांचा सातवा अवतार म्हणजे सिध्दराज या नावाने प्रसिध्द आहे. लीलाविश्वभंर दत्त या नावाने अवतरुन अपेक्षित असलेले सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयप्रभूंनी सिध्दराज या नावाचा अवतार घेतला. सदगुरु श्री लीलाविश्वंभर देव हे एकदा स्वत:चे रुप लोकाच्या लक्षात येऊ न देता बालरुपाने प्रकट झाले व भूतलावर इतस्तत: पर्यटन करीत करीत हिमाचल प्रदेशातील बदरिकावनात एकटेच प्रविष्ट झाले. तेथे अनेक सिध्द् लोक वास्तव्य करीत होते. त्यांनी खडतर तपश्चर्या करुन कष्टसाध्य अशा सिध्दि मिळविलेल्या होत्या. त्या सिध्दिंच्या जिवावर ते अनेक प्रकारचे सुखे भोगीत व चैन करीत काळ कंठीत होते. सिध्दिंच्या बळावर ते खूपच कामाक्रोधदि विकारांच्या आहारी गेलेले होते. कोणी लंगोटी परिधान करुन तर कोणी नग्न अवस्थेतहि राहत होते. कोणी मौन धारण करुन बसलेले होते, तर कोणी आत्मप्रौढींचे वर्णन करण्यात गर्क झालेले होते. कोणी आस्तिकांचा पक्ष घेऊन तर कोणी नास्तीकांचा पक्ष घेऊन निरनिराळया विषयांवर वादविवाद करीत बसलेले होते. एकदा त्या सिध्दांचा मेळावा एका ठिकाणी जमला होता. त्या मेळाव्यात लीलाविश्वंभर दत्तात्रेय हे बालरुप धारण करुन सर्वांच्या मागे जाऊन बसले. सर्व सिध्दांच्या स्वभावाची परीक्षा पाहणे व त्यांच्या गर्वाचा परिहार करणे हा उद्देश्य दत्तात्रेयांनी मनात ठेवलेला होता. दत्तात्रेयांचे ते अत्यंत तेजस्वी व दिव्य बालरुप पाहून सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे आकृष्ट झाली. अत्यंत मनोहर असलेले बालयोगी भगवान दत्तात्रेय योगमूद्रेने बसलेले होते. दत्तात्रेयांना ऐटीत बसलेले पाहून सर्वांनी त्यांना प्रश्न केला,
“बाळ तु कोण आहेस?” त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात”
“तूझा आश्रय कोण आहे ते तरी सांग!” दत्तात्रेय म्हणाले, “मला कोणी आश्रय नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकहि नाही.”
“तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती?” दत्तात्रेय म्हणाले “माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.”
यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे?” त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर दिले की, "मला कोणी गुरु नाही."
पुन्हा सिध्द म्हणाले, “तुझी मुद्रा कोणती, वैष्णवी की शांभवी?” सिध्दराज म्हणाले "माझी ही करुणात्मक मायेच्या पलीकडची निरंजनी मुद्रा आहे”
“अरे ती कशी असते?” सिध्दराज म्हणाले “जसा मी आहे तशीच ती असते”
“अरे या मूद्रेत तुला काय दिसत आहे” सिध्दराज दत्तात्रेय म्हणाले, “ध्यानातील अवस्थेत जे प्रचीतीला येते अर्थात ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीच्या पलीकडचे जे काही तत्व आहे तेच माझे ध्येय होय”
याप्रमाणे ती सिध्दमंडळी व भगवान श्री दत्तात्रेय यांचा वादविवाद चालला असताना आकाशमार्गाने जात असलेले अकरा रुद्रा, बारा आदित्य, अष्ट वसू आणि त्याचप्रमाणे एकोणपन्नास मरुद्रगण तसेच महर्षि, साध्यदेव, यक्ष, गंधर्व व किन्नर हे जात असता त्यांची गति कुंठित होऊन ते सर्व भूतलावर त्या ठिकाणी अवतरले. त्यांना पाहून ती सर्व सिध्दमंडळी आश्चर्यचकित झाली. सिध्द लोकांना वाटले हे त्यांच्या सिध्दीचे फळ आहे व त्यामूळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यांचा तो परस्परांमध्ये चाललेला कलह पाहून श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले,
"सिध्दजनहो तुम्ही आपसात हे भांडण का करीत आहात तुम्ही सर्वच श्रेष्ठ आहात, पण तुमच्यात अधिक श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय घेण्याची सोपी युक्ती मी तुम्हांला सांगतो. गति कुंठित होऊन भूमंडलावर या ठिकाणी उतरलेले हे सर्व देव आणि इतर लोक ज्याच्या शब्दाने पुन: वर जातील तो तुम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे समजा."
त्यांचे भाषण ऐकून सर्व सिध्दजनांनी प्रयत्न केले पण एकाच्याही शब्दाचा उपयोग झाला नाही. कोणीही देव अथवा ऋषि मुनी आपआपल्या स्थानी हलूहि शकले नाही. यामुळे आपण खूप मोठी सिध्दी मिळवलेली आहे असे मानणारे ते सर्व सिध्दलोक अत्यंत लज्जित झाले. त्यांचा क्रोध मावळला. अहंकार पार गळाला. ते सर्व सिध्द निस्तब्ध झाले. त्यानंतर सिध्दराज श्री दत्तात्रेय म्हणाले
"देव हो, ऋषि-मुनिजनहो तुम्ही सर्व आपआपल्या स्थानाला सत्वर जाऊन पोहोचावे. मी तुमचा प्रतिबंध दूर केला आहे. तुम्ही तिळमात्रही चिंता न करता आनंदाने आपआपल्या स्थानाला जावे. माझा तुमच्यावर अनुग्रह आहे."
हे शब्द ऐकल्याबरोबर सर्व मंडळी एका क्षणात आपापल्या स्थानाला जाऊन पोहोचली. हे पाहून बदरिकाश्रमातील सर्व सिध्द महात्मे आश्चर्यचकित झाले व म्हणू लागले, खरोखर हा प्रत्यक्ष परमात्माच बालरुपाने आपल्यापुढे आवतरला आहे. सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांच्या चरणी सादर प्रणिपात केला. देव व सिध्द यांनी त्या ठिकाणी दत्तात्रेय यांची मुक्त कंठाने स्तुति केली. सर्व सिध्दांना सिध्दी देणाऱ्या दत्तात्रेयांना सिध्दराज असे नाव देण्यात आले.
रहस्य, न्यास, कवच इत्यादि सर्व तांत्रिक पध्दतींचाही उपदेश त्यांनी केला. सिध्दराजांनी स्वत:च हि शास्त्रपध्दत सांगितलेली असल्यामुळे या पध्दतीला सिध्दराजगम असे म्हणतात. हि सिध्दराज पध्दत श्री दासोपंत यांनीही उपदेशीली आहे. दासोपंतानी ती लिहूनही ठेवलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ सिध्दराजगम या नावाने प्रसिध्द आहे.
श्री दत्तगुरू बद्रीवनात विश्वंभर नावाच्या बालक रुपात अवतरीत झाले, जिथे अनेक सिद्धपुरूष विविध प्रकारच्या तपांचे आचरण करीत होते. काही जण सिद्धी प्राप्त करून मूळ उद्देश बाजूला ठेवून अनेक सुखांचा आनंद घेत होते. काहीजण देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्या ध्यानात मग्न होते, तर काही जण त्याच्या शोधात मग्न होते. विश्वंभर स्वामी सिद्धांच्या या सभेत एका कोपऱ्यात बसले होते. श्रीमुखमंडलावरील ती अद्वितीय आभा पाहून पाहून त्या सिद्धांनी श्रीगुरूंना विचारले की;
प्र. "तू कोण आहेस?"
उ. श्री दत्तात्रेय "मला बाह्यरूपाने किंवा उपाधीने जाणता येत नाही".
प्र. "तुझे निवासस्थान कोणते आहे?"
उ. "माझ्याकडे निवास नाही व माझे आश्रयदाते गुरुही नाहीत."
प्र. "तुमचा योग कोणता आहे? आपल्या अभ्यासाची पद्धत काय आहे?"
उ: "माझा चित्रयोग आहे आणि माझ्या अभ्यासाचा कोणताही विशेष प्रकार नाही."
प्र. "तुमची मुद्रा कोणती आहे?"
उ. "माझी अत्यंत दयाळू अशी निरंजनी मुद्रा आहे."
प्र. "या मुद्रेमध्ये आपण काय पाहत आहात?"
अ. "मी ध्यानावस्थेच्याही पलिकडे पाहतो आहे. माझे लक्ष्य असे तत्त्व आहे जे ध्याता, ध्यान आणि ध्येय या तीनही गोष्टींच्या पलीकडे आहे."
प्र. "आपला मार्ग कोणता आहे?"
उ. "माझे मार्ग म्हणजे शिवत्त्व (शाश्वत तत्त्व) ची पूर्तता आहे."
श्रीगुरूंचा त्या सिद्धांशी हा संवाद चालू असताना ११ रुद्र, १२ आदित्य, ४९ रुद्रगण, ऋषी, मुनीस, देवगण, गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादी आकाशमार्गे जात होते. अचानक त्यांच्या हालचालीत अडथळा निर्माण झाला, ते सर्व बद्रीवनात उतरले. तेव्हा प्रत्येक सिद्धपुरूष आपले महत्त्व सिद्ध करण्यासाठी बोलू लागले की त्यांच्या तपश्चर्येचे बलाने त्यांच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ते पृथ्वीवर खाली उतरले. एवढ्यात अवतार धारण केलेले श्रीदत्तराज, म्हणाले, "तुम्ही सगळे व्यर्थ संघर्ष का करता? जो त्यांच्या हालचालीतील अडथळा दूर करून, त्यांना आकाशातून जाण्यास परवानगी देऊ शकेल तोच सर्वोत्तम सिध्द असेल असे आपण मानूया.'' श्रीगुरूंचा हा युक्तिवाद सर्वांनी मान्य केला आणि प्रत्येकजण पुढे येऊन आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. परंतु कोणीही त्या देवगणांना पुन्हा आकाशमार्गाने पाठविण्यात यशस्वी झाले नाही. शेवटी श्री दत्तात्रेय म्हणाले, "हे सुरगणांनो आपण आपल्या ईच्छित स्थळी प्रस्थान करू शकता, तुमच्या हालचालीतील अडथळा काढून टाकण्यात आला आहे." गुरूदेवदत्तांच्या मुखातील हे उद्गार ऐकून, सर्व गण श्री दत्तप्रभूंना अभिवादन करून तेथून निघून गेले आकाश. झाला प्रकार पाहताच सर्व सिद्ध पुरूषांना कळून चुकले की मुलगा सामान्य नसून परमात्मयोगी आहे. म्हणून अहंकार त्यागून ते त्यांना शरण गेले.
कुमारयोगी श्री दत्तप्रभू म्हणाले, "मी सिद्धराज, योगीराज आहे. कालाग्निशमन करणाऱ्या आणि दुःखाचे निर्मूलन किंवा हरण करणारा असल्यामुळे मला 'हरी' असेही संबोधले जाते. आत्मज्ञानाचा विचार करताना आणि त्यायोगे मला प्राप्त करण्यासाठी, मंत्रांचा अभ्यास करावा. मीच मंत्रराज, अमर आणि परब्रह्मरूप आहे. सर्व विश्वाचा मी नियंता आहे; पण मी स्वतः मात्र मंत्रांच्या अधीन आहे. योग्य प्रक्रियेनुसार साधना केल्यास मंत्रांद्वारे तुम्हाला त्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात ज्या मिळविण्याचा तुम्ही प्रयास करत आहात." हे सांगून त्यांनी त्यांना काही मंत्र आणि त्यांची कार्यपद्धती सांगितली. त्या सर्व मंत्रउपदेशांना एकत्रितपणे 'सिद्ध राजआगम' असे म्हटले जाते.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी, श्री दत्तात्रेय यांनी हे अंबेजोगाई (महाराष्ट्र) च्या आपल्या महान आवडत्या भक्त दासोपंत यांना पुन्हा एकदा हे रहस्य कथन केले. त्यांनी लिखित स्वरूपात ते जतन केले आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला, मघा नक्षत्रावर हा अवतार झाला.
ध्यान-ध्यातृ-ध्येयरूपा | चित्रयोगादीसंस्थितः ||
सिद्धराजावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
ध्यान-ध्याता-ध्येय या तीनही अवस्थारूप (आणि तरीही त्याच्याही पलिकडे) असणाऱ्या, चित्रयोगावस्थेत राहणाऱ्या, सिद्धराज अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
८) ज्ञानसागर
सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले.
जन्म:- फाल्गुन शुद्ध १०
श्रीदत्तात्रेय यांचा आठवा अवतार ज्ञानराज हा होय. एकदा विश्वगुरु भगवान श्रीदत्तात्रेय एकांतामध्ये बसले असता विचार करु लागले की. हे सिध्द लोक माझ्या उपदेशाने सिध्द झाले खरे पण जोपर्यंत कामक्रोधादि विकार समूळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत खऱ्या शांतीचा व सुखाचा त्यांना लाभ होणार नाही. काम हा सर्व दु:खांचे मूळ आहे व कामामूळेच जीव हा सतत संसारामध्ये धडपड करीत असतो. काम हाच कर्ता व करविता आहे. कामाच्या जोडीला क्रोधहि पाठोपाठ धावत येतोच, हे सर्व जगच कामाच्या आधिन आहे. काम म्हणजे इच्छा. मनात इच्छेचा अंकूर निर्माण झाला की त्या इच्छेतून दूसरी इच्छा, दुस-या इच्छेतून तिसरी इच्छा निर्माण होते. अशा रीतीने हे सर्व जग विषयाभिलांषांच्या जाळयात सापडतं व चिंतेने त्रस्त होते, तेंव्हा सिध्दराज दत्तात्रेय मनाशी विचार करतात की, मला या सर्वांना या कामाच्या जाळयातून सोडविले पाहिजे. या लोकांना ज्ञानानेच सायुज्याचा लाभ होईल व ते पूर्ण सुखी होतील, असा विचार करुन परमदयाळू भगवान श्रीदत्तात्रेय ते पूर्वीचे त्रिगुणातीत आणि नित्य शुध्द, बुध्द, मुक्ता असे आपले स्वाभाविक रुप व आपली सहजावस्था क्षणभर बाजूला ठेवून पुन्हा कौमाररुप धारण करुन प्रकट झाले. हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार होय. या अवताराला ज्ञानसागर असे अनुरुप नाव देण्यात आले.
ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते. बद्रीकाश्रमातील सिध्दांचा समुदाय ज्या ठिकाणी बसला होता तेथे डोक्याइतक्या उंच स्थानावर आकाशात अधांतरी विराजत असलेल्या दत्तात्रेयांना पाहून त्याचा प्रभाव सहन न झाल्यामुळे दत्तात्रेयांच्या त्या सिध्दीचा अथवा शक्तीचा पराभव करण्याचा विडा उचलला. सर्वांनी आपापल्या परीने दत्तात्रेयांना खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही दत्तात्रेयांना स्वस्थानापासून तिळमात्रहि हलवू शकले नाहीत. त्यांच्या त्या प्रयत्नाने दत्तात्रेयांची मुद्रा तिळमात्र ही ढळू शकली नाही. तेव्हा सर्व सिध्दांची खात्री झाली की हा कोणी सामान्य सिध्द नसून साक्षात परमात्माच आहे. असे समजून त्यांनी दत्तात्रेयांना नमस्कार केला.
बद्रीवनात श्रीगुरूंचे भ्रमण चालूच होते. एकदा भगवान श्री दत्तात्रेयांनी विचार केला की, "या लोकांनी योग सिद्धी प्राप्त केली, परंतु काम, क्रोध, लोभ इत्यादी षड्रिपूंवर त्यांनी विजय मिळवले नाहीत आणि तोपर्यंत त्यांना मनाची खरी शांती मिळणार नाही आणि त्यांना कधीच शाश्वत आनंद मिळणार नाही. काम म्हणजे इच्छा, वासना ह्याच सर्व दुःखांच्या मुळाशी आहेत आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनात लढत आहे. क्रोध सुद्धा या ईच्छांच्या अपूर्णतेतूनच जन्म घेतो. संपूर्ण जग या संघर्षात ओढले आणि व्यापिले गेले आहे आणि त्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारचे भोग त्यांना भोगावे लागत आहेत. म्हणून सर्व लोकांनी काम, क्रोध, लोभ इत्यादिंच्या बंधनांच्या पलिकडे जायला हवे म्हणजे मग ते ज्ञान प्राप्त करतील आणि माझ्याशी एकरूप होतील." म्हणून श्री दत्तात्रेय 'ज्ञानसागर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमार स्वरूपात अवतरीत झाले. हा अवतारात प्रभू अवकाशात साधारण एक मनुष्य उंचीवर हवेत अधांतरी दिसू लागले. सहाजिकच त्या सिद्धांचे लक्ष वेधले गेले आणि ते ह्या कुमाराला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी अथक प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. त्यांना कळून चुकले की हे तेच परमात्मा आहेत आणि ते त्या कुमाररूप श्रीगुरूंना शरण गेले आणि त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली.
त्यावर प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेय म्हणाले,"कामामुळे क्रोध वाढीस लागतो, क्रोधामुळे सद्सद्विवेकबुद्धीचा लय होतो आणि अयोग्य कृती होतात. षड्रिपूंवर विजय मिळवण्याऐवजी जे केवळ सिद्धींच्या पाठी लागतात त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच होते. जे सिद्धींच्या पाठी जातात, ते मझ्याशी एकरूपता न पावता शाश्वत आनंदाला मुकतात.""म्हणूनच तुम्ही मला अनन्यभावाने शरण जा, मंत्रांचे पुरश्चरण करा (नाम घ्या) आणि शाश्वत तत्त्व जाणून घ्या आणि नैतिक जीवन जगा. मला बुद्धी किंवा तर्काने मला जाणता येत नाही. त्यामुळे आपण कामक्रोधादींवर विजय मिळवावा व माझी भक्ती चालू ठेवावी." हा उपदेश ग्रहण करून नंतर सिद्धांनी श्री दत्तप्रभूंनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण केले आणि शाश्वत आनंद मिळविला. सिद्धांच्या कल्याणाकरिता बद्रीवनात हा अवतार फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी झाला.
कुमारप्रभवे तुभ्यं | सिद्धजनप्रबोधका ||
ज्ञानसागरावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
कुमाररूपात आपली प्रभा प्रकट करणाऱ्या, सिद्धजनांना ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या, ज्ञानसागरावतार धारण केलेल्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
No comments:
Post a Comment